Home > Politics > ईडीच्या कारवाई वरून नवाब मलिक यांची भाजपवर टीका

ईडीच्या कारवाई वरून नवाब मलिक यांची भाजपवर टीका

ईडीच्या कारवाई वरून नवाब मलिक यांची भाजपवर टीका
X

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावर नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.

ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी झाली आहे. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्या पध्दतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होते आहे याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व किती प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते असेही नवाब मलिक म्हणाले.

Updated : 30 Aug 2021 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top