Home > Politics > Rajyasabha election : एकमेव मनसे आमदाराचे मत कोणाला? राजू पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

Rajyasabha election : एकमेव मनसे आमदाराचे मत कोणाला? राजू पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

Rajyasabha election : एकमेव मनसे आमदाराचे मत कोणाला? राजू पाटील यांनी दिले स्पष्टीकरण
X

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल असल्याचे म्हटले जात होते. त्यावर राजू पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच ही लढत भाजपचे धनंजय महाडिक विरुध्द शिवसेनेचे संजय पवार यांच्यात होणार आहे. तर ही जागा आम्हीच जिंकणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत कुणाच्या पारड्यात पडणार यावरून चर्चा रंगली होती. त्यावर राजू पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राजू पाटील यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, चिंता नसावी, आमच्यासाठी राज ठाकरे यांचा शब्द प्रमाण आहे. याबरोबरच राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावरही राजू पाटील म्हणाले, मी माणूस आहे, घोडा नाही, असा टोलाही घोडेबाजार होणार असल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना लगावला.

संजय राऊत यांनी केला होता आरोप

संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणूकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांचे मत महत्वाचे असणार आहे, असे मत व्यक्त केले होते. त्याबरोबरच राज्यसभा निवडणूकीत विरोधी पक्ष घोडेबाजार करणार असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. मात्र संजय राऊत यांच्या आरोपानंतर अपक्ष आमदार घोडेबाजार शब्द वापरल्याने नाराज झाले असल्याची चर्चा होती. मात्र आता राजू पाटील यांनीही आपण घोडा नसून माणूस असल्याचे म्हटले आहे.

Updated : 5 Jun 2022 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top