Home > Politics > बंड झाले, आता थंड झाले? मनसेचा टोला

बंड झाले, आता थंड झाले? मनसेचा टोला

बंड झाले, आता थंड झाले? मनसेचा टोला
X

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे, भंडारा बलात्कार प्रकरणाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार स्थापन होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. पण तरीही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागलेला नाही. शिवसेना आणि शिंदे गटाची लढाई सुप्रीम कोर्टात आहे आणि त्यामुळे विस्तार रखडल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधकांनी टीका केली असताना आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले होते. पण आता त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. "बंड झाले,आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?

@mieknathshinde"

असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Updated : 8 Aug 2022 11:50 AM IST
Next Story
Share it
Top