शाहू महाराजांसारखेच शरद पवारांना घेरण्याचा मनुवाद्यांचा प्रयत्न – जितेंद्र आव्हाड
X
सध्या भाजप आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत शरद पवार यांना छत्रपती शाहू महाराजांप्रमाणेच त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बहुजनवाद विरुद्ध मनूवाद या मथळ्याखाली त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. "आज कोल्हापूरमध्ये शाहुंच्या विचारांवरती जागर करायला गेलो होतो. सहज आठवलं कि सनातन आणि मनुवाद्यांनी असच शाहू महाराजांना घेरलं होतं. त्यांच्या बदनामीच मोठं षडयंत्र आखलं होतं. पण अशांना घाबरून शाहू महाराज थांबतील तर ते शाहू महाराज कसले.
ह्या सगळ्यांना लाथाडून त्यांनी आपले विचार लोकांच्या मनामनात पोहचवले. त्यांना थांबविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आणि ते सनातनी आजही कोणाच्या लक्षात नाहीत. पण शाहू महाराज आणि त्यांचे विचार हे संपूर्ण देशात घराघरात आहेत.
असच काहीसे शरद पवार साहेबांच्या बाबतीत घडतयं. चहुबाजूनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न सनातनी आणि मनुवादी करीत आहेत. एका चक्रव्यूहात अडकून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण अशांना घाबरून शरद पवार साहेब थांबतील तर ते शरद पवार साहेब कसले. जेव्हा जेव्हा बहुजनवादी विरुद्ध सनातनवादी युद्ध होते. तेव्हा तेव्हा हे सगळं घडतच राहत. आणि काळ त्याला साक्षीदार आहे. - जितेंद्र आव्हाड






