धनंजय मुंडे यांचा पंकजांना टोला, "लोकनेत्याकडूनच या कारखान्याला भगदाड"
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 May 2022 11:41 AM IST
X
X
वैद्यनाथ साखर कारखान्यावरून समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. परळीतील वैद्यनाथ कारखाना वारसा हक्काने मिळाला मात्र लोकनेत्याकडूनच या कारखान्याला भगदाड पडले आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत, असे सांगत येणाऱ्या निवडणुकीसाठी पैशाची बचत सुरू असल्याची टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला तर आपण वैद्यनाथ साखर कारखाना नव्याने चालवून दाखवू असा दावाही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.
Updated : 30 May 2022 11:41 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






