राज्यसभा निवडणूक : काँग्रेसला भाकरी फिरवता आली नाही
X
राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर ५ जागांचा निकाल निश्चित आहे. तर सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. पण दुसरीकडे काँग्रेसची एक जागा निश्चित असताना पक्षाने महाराष्ट्रातील एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्याची अपेक्षा होती, पण पक्षाने पुन्हा एकदा बाहेरील नेत्याला उमेदवारी दिली आहे. इम्रान प्रतापगढी यांना काँग्रसने महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. प्रतापगढी हे प्रियंका गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून समजले जातात. राज्य काँग्रेसमधील नेत्यांमध्ये या निर्णयावरुन नाराजी असल्याची चर्चा आहे. हायकमांडने राज्यातील एखाद्या नेत्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती, पण ही मागणी फेटाळण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अत्यंत अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला भाकरी फिरवण्याची संधी होती पण ती फिरवता आली नाही, अशी टीका होते आहे.
काँग्रेसला भाकरी फिरवता येत नाही ! pic.twitter.com/hJwQBQDLaO
— Ravindra Ambekar (@RavindraAmbekar) May 29, 2022
दरम्यान काँग्रेसने रविवारी राज्यसभेच्या १० जागांसाठी उमेदवार जाहीर केले, त्यावरुनही काँग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. काँग्रसचे नेते पवन खेरा यांनीही ट्विट करत ‘शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई’ या शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
‘शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई’
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) May 29, 2022
त्यानंतर अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नजमा यांनीही ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सोनिया गांधी यांनी आपल्याला राज्यसभेची संधी देऊ असे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण झाले नाही, या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हमारी भी १८ साल की तपस्या कम पड़ गई इमरान भाई के आगे । https://t.co/8SrqA2FH4c
— Nagma (@nagma_morarji) May 29, 2022






