संजय राऊत यांचे बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Jun 2022 12:19 PM IST
X
X
एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना संजय राऊत यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. जे खोटे होते ते शिवसेनेबाहेर गेले आहेत, त्यांची शिवसेना असू शकत नाही, हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
“नारायण राणे यांना मानतो त्यांनी राजीनामे दिले निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढविण्याची हिंमत दाखवा” असे ओपन चॅलेंज आहे, त्यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे.
“आसाममध्ये पूर आला आहे आणि तिथे हे लोकं पार्ट्या करत आहे. काही आमदारांशी आता पाच मिनिटांपूर्वी माझं बोलणं झालं त्यांनी इथे यायची इच्छा व्यक्त केली आहे. जबरदस्तीने आमदारांना डांबून ठेवले आहे किती दिवस ते गुवाहाटीला राहणार आहेत.” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.
Updated : 26 Jun 2022 12:19 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






