Home > Politics > उद्या विधानपरीषदेचा रणसंग्राम : १० जागांसाठी उद्या मतदान

उद्या विधानपरीषदेचा रणसंग्राम : १० जागांसाठी उद्या मतदान

उद्या विधानपरीषदेचा रणसंग्राम : १० जागांसाठी उद्या मतदान
X

अत्यंत चुरशी होत असलेल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. बिहारमध्ये 7 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरवात होणार असून पाच वाजता मतमोजणी केली जाणार आहे. रात्री उशिरा विधानपरीषद निकाल घोषीत होईल.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उद्या 20 जूनला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया 2 जूनला सुरु झाली होती. 9 जून ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.

मुदत संपलेले सदस्य

१. सुभाष देसाई (शिवसेना)

२. प्रविण दरेकर (भाजपा)

३. रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)

४. सदाभाऊ खोत (भाजपा)

५. दिवाकर रावते (शिवसेना)

६. प्रसाद लाड (भाजपा)

७. सुजीतसिंह ठाकूर (भाजपा)

८. संजय दौंड (राष्ट्रवादी)

९. विनायक मेटे (भाजपा)

१०. रामनिवास सिंह (भाजपा, निधन झाल्याने जागा रिक्त)

या राज्यातही होणार निवडणूक

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. बिहारमध्ये 7 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी 20 जून रोजी पार पडणार आहे.

असा होता विधान परिषद निवडणूक कार्यक्रम

नोटिफिकेशन – २ जून २०२२

उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२

अर्जांची छाननी – १० जून २०२२

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२

मतदानाचा दिवस – २० जून २०२२

मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४

मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

महाराष्ट्रात अशी होतेय लढत...

विधानपरिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगणार आहे.विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ नाही.

राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणीस यांनी अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पराभव करून त्यांनी तिसरा उमेदवार जिंकून आणला. हा करिश्मा फडणवीस विधानपरिषदेत करू शकता का? कोणाकडे किती संख्याबळ? भाजपचं पारडं जड का महाविकास आघाडीचं?

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे.

काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिलीये.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?

भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिलीय. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय.

महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?

राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक होतेय. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली जातेय.

महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.

शिवसेना- 55

राष्ट्रवादी काँग्रेस- 53

काँग्रेस- 44

विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज भासणार आहे. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे.

पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. ठाकरे सरकारकडे अपक्षांच्या जोरावर 169 आमदारांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी राज्यसभेत अपक्षांची मोट बांधण्यात मात्र उद्धव ठाकरे अपयशी ठरले होते.

Updated : 19 Jun 2022 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top