Home > Politics > आदित्य ठाकरे : लिहून घ्या हे सरकार कोसळणार

आदित्य ठाकरे : लिहून घ्या हे सरकार कोसळणार

आदित्य ठाकरे : लिहून घ्या हे सरकार कोसळणार
X

शिवसेनेते बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत स्थापन केलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने सध्या आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण या मतदारसंघात जंगी रोड शो केला.

शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी लिहून घ्या हे सरकार कोसळणार अन् मध्यवर्ती निवडणूक होणार म्हणजे होणारच, असा दावा केला. तसंच उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना मदतीची गरज असताना यांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

औरंगबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करून दाखवलं आणि त्यानंतर कुठेही दंगल झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी कधी जातपात भेदभाव केला नाही, सर्व लोक आपली आहेत, पण शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असा थेट आरोप त्यांनी केला.

"उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला आणि भुमरे यांना मंत्री केलं. भुमरे नेहमी सांगतात फंड दिला नाही. वॉटर ग्रीडसाठी पहिली योजना पैठणला दिली. शिवसेनेनं काही कमी केलं नाही लोकांसाठी, गद्दारांना काही कमी केलं का? पाच वेळा यांना उमेदवारी दिली. या लोकांना काय कमी दिले, याचा विचार माझ्या डोक्यात आहे. माझ्या डोळयात अश्रू होते, पण आता रडायचं नाही लढायचं, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Updated : 23 July 2022 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top