Home > Entertainment > भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेला जनमुक्तीचा ग्रंथ आहे. - मंजुल भारद्वाज

भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेला जनमुक्तीचा ग्रंथ आहे. - मंजुल भारद्वाज

थिएटर ऑफ रेलेवंस दोन दिवसीय 'संविधान नाट्य महोत्सव' 24-25 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेला जनमुक्तीचा ग्रंथ आहे. - मंजुल भारद्वाज
X

भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेले जनमुक्तीचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लोकशाही व्यवस्थेचा मार्गदर्शक व सूत्र संचालक आहे! स्वातंत्र्य चळवळीच्या मंथनातून बाहेर आलेले हे अमृत आहे, ज्याने भारतातील जनतेला वर्णव्यवस्थेतून मुक्त केले आणि विधिसमंत प्रत्येकाला माणूस म्हणून समान अधिकार दिला.

स्वातंत्र्याच्या मंथनात बाहेर पडलेल्या धर्म आणि धर्मांधतेच्या विषाने देशाचे विभाजन केले. वर्णवादी धर्मांधांनी देशाचे तुकडे केले आणि त्याचा दोष स्वातंत्र्याच्या नायकांवर टाकला.

स्वातंत्र्याची तप्तवस्था होती, म्हणून फाळणीची विभिषिका आणि गांधी हत्येनंतर, धर्मांध आणि वर्णवादी सुप्तावस्थेत गेले, ज्यांना संपूर्ण क्रांतीने सामाजिक मान्यता आणि भारतीय राजकारणात सक्रिय होण्याची संधी दिली.

जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या मध्यमवर्गाला विकासाचे गाजर दाखवून या धर्मांध वर्णवाद्यांनी भारतीय लोकशाहीत सत्ता काबीज केली आणि संविधानाच्या मूलभूत स्तंभांना उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. सर्वप्रथम, भारतीय असण्याचा गर्व आणि स्वाभिमानाचे रूपांतर हिंदू असण्याच्या गर्वात झाले. मग धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला सर्वोच्च न्यायालयाद्वारे ठेचून काढले आणि दगडाला देव मानून मंदिर बांधण्याचा निर्णय देण्यात आला. त्यानंतर सत्ताधारी हुकूमशहाने उघडपणे मॉब लिंचिंग आणि बहुलवादाचे समर्थन केले.

संविधानाच्या संरक्षणासाठी असलेल्या सर्व स्तंभांवर एकाधिकार गाजवला.निवडणूक आयोग, प्रशासन, कनिष्ठ न्यायालये, केंद्रीय तपास यंत्रणा आणि प्रसारमाध्यमं. धर्मांध वर्णवादी हुकूमशहाला विरोध करणाऱ्या मोजक्या लोकांना एकतर तुरुंगात टाकण्यात आले किंवा मारले गेले.

एका विशिष्ट बहुल समुदायाला वेळोवेळी भडकावण्यात आले आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली महिलांची सार्वजनिकपणे त्यांच्या योनीत बोटे घालून जमावाकडून धिंड काढण्यात आली, त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आणि संपूर्ण जगाने पाहिला. पण हुकूमशहा डगमगला नाही आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने त्यांना भरघोस मतांनी विजयी केले.

हुकूमशहाचा हा विजय लोकशाहीचा विजय नाही, हा जनतेचा विजय नाही, हा धर्मांध वर्णवाद्यांचा विजय आहे. हा सरंजामशाही, फॅसिझम आणि वर्णवादाचा विजय आहे. हा संविधान विरोधकांचा विजय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या नायकांच्या विरोधकांचा हा विजय आहे. स्वातंत्र्याने जागृत झालेल्या राजकीय चेतनेच्या शत्रूंचा हा विजय आहे. हा भारतविरोधी हिंदु राष्ट्राच्या समर्थकांचा विजय आहे !

विचार करा, धर्मनिरपेक्षता, समता, समानता,बंधुता नसलेले संविधान म्हणजे काय? प्राणविहिन शरीरासारखा फक्त कागदाचा तुकडा. राजेशाही, मुघल राजवट आणि इंग्रजांचेही नियम आणि कायदे होते, पण संविधानाने प्रथमच सर्व भारतीयांना समान मानले आणि समान अधिकार दिले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे भारताला माता मानतात, जे महिलांची पूजा करतात, त्यांनी स्त्रीला माणूस मानले नाही, भारतीय संविधानाने त्या स्त्रीला माणूस म्हणून समान अधिकार दिला आहे.

धर्मनिरपेक्षता, समता, समता आणि बंधुत्वाशिवाय भारत जातीयवादी धर्मांध श्रद्धा, सूत्रे, सूक्ते आणि सत्ताधीशाच्या सनक वर चालेल आणि मणिपूर आणि जंतरमंतरची भयंकर दृश्ये जगभर व्हायरल होत राहतील. संविधानपूर्व भारतात आदिवासी, बहुजन आणि महिलां सोबत होत होते तेच होईल.

म्हणूनच संविधानाला वाचवण्यासाठी व्यक्तिपूजा सोडून वर्णवादी आणि धर्मांध शक्तींना कंठस्नान घालून परास्त करणे आवश्यक आहे. उरल्या सुरलेल्या मानवतेच्या पुरस्कर्त्यांनी संघटित होऊन व्यापक प्रतिरोधाचा एल्गार देऊया जो सार्थक आणि संविधान वाचवण्यात यशस्वी होईल!

या नाट्य महोत्सवात रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित महाराष्ट्राच्या वैचारीक प्रगतीशीलतेचा वारसा जपणारी दोन मराठी नाटके सादर होणार आहेत.

• रविवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सादर करण्यात येणार आहे

नाटक : राजगती

राजगती हे नाटक राजकीय परिस्थिती बदलण्याचे सूत्र आहे. राजकीय नेतृत्वात आत्मबळ निर्माणासाठीचे विचारमंथन आहे. राजनीती घाण नसून मानवी कल्याणाची पवित्र निती आहे, हा उदघोष देऊन राजगती हे नाटक जनतेला राजकीय संभ्रमातून मुक्त करते आणि संविधानानुसार भारताचे मालक असण्याची ज्योत जागवते.




• सोमवार 25 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा

नाटक : गोधडी

गोधडी हे नाटक सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्धचे बंड आहे. वर्णवादमुक्त भारताची प्रतिज्ञा आहे. सांस्कृतिक शोषण, अस्पृश्यता, भाग्य आणि देव यांच्या चक्रात पिसलेल्या भारतीयत्वाला मुक्त करण्याची गाज आहे! गोधडी हे नाटक आपल्या मूळ संस्कृतीचा शोध आहे!




कुठे: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नाट्यगृह, भायखळा, मुंबई

Updated : 19 Dec 2023 1:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top