गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सरकारी योजनांपासून वंचित

Update: 2021-10-30 14:48 GMT

राज्यात स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाचा घोळ सुरू आहे. शासनाकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. परंतू या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोवण्याठी काही संस्था कार्यरत आहेत. एसी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी ही संस्था कार्यरत आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेने गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी वेतन दिलेले नाही. या लाभापासून वंचित असलेले नागपूर जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भेटण्याकरिता पुण्यात आले आहेत. सगळी माध्यमे एकीकडे आर्यन खानचं प्रकरण दाखवत असताना दुसरीकडे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी या विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणुन घेण्याचा केलेला हा प्रयत्न...

Similar News