कोरोना व्हायरस शी लढा देताना आज राज्यातील दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला माहिती दिली. आज त्यांनी फेबबूक वरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दोन पोलिस कोरोना च्या या युद्धात शहीद झाले आहे.
त्यांना मी आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. तसंच त्यांना सरकारी नियमानुसार त्यांच्या कुटुंबियांना सरकार मदत तर करेलच. त्याचबरोबर या पलिकडे जाऊनही काही मदत करता आली तर सरकार निश्चित करेल. असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे.