NRC हा वादग्रस्त विषय आहे, पण केंद्राला काही गोष्टीत मदत करायची भूमिका आहे आणि काही बाबतीत विषय तपासायची आणि मग निर्णय घेण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे, ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आहे,याबद्दल त्या पक्षातून स्पष्टपणे यावर कोणी बोलत नाहीय अशी टीकाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. देशातील लोक भाजपला नाकारत आहेत, लोकांना बदल हवा आहे, दिल्लीत पण बदल झाला आहे, असंही शरद पवार म्हणाले. देशातील अर्थव्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं असा टोलाही त्यांनी लगावला आहे.