'या' तीन मंत्र्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, याचिका फेटाळली

Update: 2019-09-13 08:59 GMT

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासह रिपाइंचे अविनाश महातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा अंतिम निकाल आज लागला. यामध्ये न्यायालयाने या सर्व मंत्र्यांना दिलासा दिला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जेष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमुर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठामार्फत या याचिकेवर सूनावणी झाली. सोमवारी यावर सुनावणी पार पाडली होती. पण उर्वरित अंतिम निकाल आज लागला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील, अविनाश महातेकर, आणि जयदत्त क्षीरसागर यांना दिलासा मिळाला आहे.

Similar News