चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधान मोदींची शरणागती - राहुल गांधी

Update: 2020-06-20 04:55 GMT

लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये कोणतीही घुसखोरी झालेली नाही असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केला. पण यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केलेला आहे.

चीनच्या आक्रमकतेपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा भूभाग सोडून दिला असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. जर भारतात घुसखोरी झालेली नाही आणि कोणतीही पोस्ट चीनने ताब्यात घेतलेली नसेल तर मग भारतीय सैनिक का मारले गेले आणि ते कुठे मारले गेले याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर, "न वहा कोई हमारी सीमा मे घुस आया है, न ही कोई घुसा हुआ है, न ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के कब्जे में है", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. यावरुन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Similar News