राजकारणात जाण्याकडे आजही सामान्य युवकांचा कल दिसत नाही. पण सामान्य युवकांनी राजकारणात का आले पाहिजे याची कारणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली आहेत. देशाच्या राजकारणाला घराणेशाहीचा शाप लागला आहे आणि तो घालवायचा असेल तसंच देशाची प्रगती करायची असेल तर जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात आले पाहिडजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींनी या आवाहनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.