NRC आणि CAB या दोन कायद्याविरोधात देशभरात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीचा सुरुवातीपासून विरोध आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रकाश आंबेकर(Prakash Ambedkar) यांनी आपली भूमिका सतत मांडली आहे. “हा कायदा मुस्लीम समूहांच्या विरोधात नाहीये तर इतर समूह देखील लक्ष झाला आहे. हे दोन्ही कायदे देशाला मारक आहेत.”
वंचित बहुजन आघाडी लवकरच राज्यभरातील समविचारी संघटनांशी बोलून राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवून नवीन वर्षाआधीच हे आंदोलन केलं जाणार आहे. राज्यातील जनतेला आमचे आवाहन आहे की, या दोन्ही बिलाच्या विरोधात हाक दिल्यावर आपण मोठ्या ताकदीने पाठीशी उभं राहावं. असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.