370 कलम हटवण्यासंदर्भात राज्यसभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर पीडीपीच्या दोन खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या खासदारांनी राज्यघटनेची प्रत ही फाडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी देताच वैंकय्या नायडू यांनी या दोन्ही खासदारांना मार्शलच्या मार्फत सभागृहाच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर या सदस्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं.