तब्बल ४० वर्षानंतर भारतीय महिला हाॅकी संघाने विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडबरोबर लढत असून हा सामना गुरूवारी रंगणार आहे. महिला ‘हाॅकीचा विश्वचषक’ भारतात घेऊन येणार का? अशी उत्सुकता आता भारतीयांना लागली आहे. दिवसेंदिवस भारतीय महिलांची खेळात वाढलेले संख्या बळ याबरोबरच त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारे यशही वाढत आहे.