आज ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजू परुळेकर यांनी फडणवीस यांना अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो चुकीचा होता का? असा सवाल केला असता फडणवीस यांनी
जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता, तर ते सरकार टिकलं असतं. 100 टक्के टिकलं असतं. ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती.
दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. आणि त्यामुळे त्यात आम्ही फारसं काही करु शकलो नाही. म्हणून मी आज जेव्हा मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं हा निर्णय चुकला होता.
सौजन्य: देवेंद्र फडणवीस/ Fb पेज आणि Insider