राज्यात आता सर्व शाळा कॉलेजेस ऑफलाईन सुरू झाले आहेत. पण ऑफलाईव वर्ग सुरू होईन केवळ दोन महिने झाले असताना आता वार्षित परीक्षा ऑफलाईन का, असा सवाल एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विषय पूर्णपणे समजलेले नाहीत, अनेक शिक्षकांनी लेक्चर्स पुरेशी घेतलेली नाहीत,त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घ्याव्या अशी मागणी या विद्यार्थिनींनी कुलगुरूंकडे केली आहे. या विद्यार्थिनींची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी..