समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी सरकार सांप्रदायिकतेचा रंग देउन हिंदु मुस्लिम वाद निर्माण करत असल्याची टिका केली आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतात चालू असलेल्या आंदोलनांमध्ये “सरकरा स्व:त जाळपोळ करुन मुस्लिमांवर आरोप करत आहे.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
“जो व्यक्ति या ठिकाणी राहिला, या देशात त्यांनी कमावलं ते कसं काय आता या देशातुन जाऊ शकतात. त्यांच्याकडून सरकार जन्म दाखला मागतयं ते कसं शक्य आहे. त्यामुळे जाणिवपुर्वक हे कामं केलं जातय.” असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलयं.