दिवसेंदीवस ढासळत्या अर्थव्यवस्थेवर विरोधकांबरोबरचं आता सत्तेत असलेल्या शिवसेनेने सामनाच्या रोखठोक या सदरातुन संजय राऊत यांनी टीका केली आहे. यात त्यांनी “देश आर्थिक आरजकतेच्या खाईत कोसळत आहे. शतकातील मोठी मंदी लाखो नोकऱ्यांचा घास घेत आहे. चंद्रयान सोडले, कलम ३७० हटवले, सर्जिकल स्ट्राइक केले ही देशाभिमानाची गोष्ट पण बेरोजगारीवर हे उत्तर नाही. बेकारी व भिकारी निर्माण करणाऱ्या अर्थव्यस्थेचे चित्र कसं बदलणार ?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.