Home > News Update > ‘हे’ आहेत मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे तीन निर्णय

‘हे’ आहेत मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे तीन निर्णय

‘हे’ आहेत मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे तीन निर्णय
X

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास मान्यता देण्यात आली. तसंच महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरिता 10 हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

त्याचबरोबर निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Updated : 19 Feb 2020 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top