राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट
X
एकीकडे देशभरात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मध्य भारतात पुढचे तीन दिवस म्हणजे 28 मेपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर राहू शकते.
हे ही वाचा...
सायन हॉस्पिटल: मृतदेहा शेजारी रुग्णांवर उपचार काय आहे वस्तुस्थिती?
शरद पवार राज्यपालांच्या भेटीला, दिल्लीश्वरांच्या मनात काय?
यापुढे महाराष्ट्रात यायचं तर आमची परवानगी लागेल; योगींना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर
पण मे महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पावसामुळे दिलासा मिळू शकतो. दिलासादायक बाब म्हणजे केरळमध्ये 28 मेच्या आसपास मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकुल बनत चालली आहे.