यादी दिलीय, आता ट्रेन जिथे जायला हवी तिथेच पोहचवा; राऊतांचा गोयलांना टोला
X
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही वेळापूर्वी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे रेल्वेगाड्या कोणत्या मार्गावर सोडायच्या याबाबत यादीची मागणी केली होती. एका तासाच्या आत ही यादी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक यांच्याकडे जमा करावी असं गोयल यांनी म्हटलं होतं.
गोयल यांच्या ट्विटला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला अपेक्षित गाड्यांची यादी दिली आहे. या गाड्या ज्या स्टेशनवर जाणं अपेक्षित आहे तिथेच पोहचवल्या जाव्यात. गोरखपूरला जाणारी गाडी ओडिशाला गेली, असं होऊ नये असा टोला राऊतांनी लगावलाय.
महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी,@PiyushGoyal फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये @AUThackeray @CMOMaharashtra @PawarSpeaks
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 24, 2020
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून मजुरांना उत्तर प्रदेशला घेऊन जाणारी रेल्वे गोरखपूरऐवजी ओडिशाला पोहोचली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हा टोला लगावलाय.