Home > News Update > समाज कल्याण मंत्र्यांना स्वच्छता आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी वेळच नाही, तीन वाजल्यापासून कर्मचारी मंत्र्यांच्या दालनाबाहेर
समाज कल्याण मंत्र्यांना स्वच्छता आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी वेळच नाही, तीन वाजल्यापासून कर्मचारी मंत्र्यांच्या दालनाबाहेर
Max Maharashtra | 11 Sep 2019 3:05 PM GMT
X
X
महाराष्ट्रातून दोनशे दिव्यांग आणि सफाई कर्मचारी मंत्रालयात समाज कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्या भेटीसाठी आले आहेत. मात्र, मंत्र्यांना त्यांना भेटायला वेळच नाही. विशेष म्हणजे समाज कल्याण मंत्री सुरेश खाडे यांनी या दिव्यांग आणि सफाई कामगारांची बैठक आयोजीत केली होती. मात्र, दिनांक 11/09/2019 ला रात्रीचे 8 वाजले तरी मंत्री न आल्यानं शेवटी या कर्मचाऱ्यांनी आता मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या राज्यातील मंत्र्यांना नियोजीत बैठक असतानाही दिव्यांग आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना 5 तास भेटायला वेळ नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
Updated : 11 Sep 2019 3:05 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire