Home > News Update > सोशल मिडीयाचा अभ्यासक्रमात समावेश करा

सोशल मिडीयाचा अभ्यासक्रमात समावेश करा

सोशल मिडीयाचा अभ्यासक्रमात समावेश करा
X

सोशल मीडिया संवादाचं प्रभावी माध्यम आहे. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया शिक्षण, प्रशिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या वाटा शोधणारंही प्रभावी माध्यम झालं आहे. कोरोनाच्या या संकटात देशातल्या शाळा लॉकडाऊन असतानाच, याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिक्षणाची दारही उघडी झालेली आपण पाहिली आहेत. त्यामुळेच तरुणाईच्या बोटांच्या इशाऱ्यावर जग जिंकण्याची ताकद असलेल्या या सोशल मिडीयाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करावा. अशी मागणी सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अजित पारसे

'महाविद्यालयाची पायरी चढली, की पूर्वी स्मार्टफोन हातात यायचा. पण आता ऑनलाईन शिक्षणामुळे लवकरच स्मार्ट फोन मुलांच्या हातात यायला लागला आहे. १० वी पास झालेली मुलं ११ वी जाताना आपल्या करिअरच्या दृष्टीनं विचार करायला लागतात. आपली भविष्याची वाट निवडतात. या तरुणांना सोशल मिडीयारील विविध संधीचा फायदा व्हावा. सोशल मिडीयाच्या माध्यमातून फक्त वर्गखोलीत दिलेलं शिक्षण नाही. तर ग्लोबल व्हीलेज म्हणून जगभरातील ज्ञान, विज्ञान, अर्थकारण, संशोधन, कला, व्यवसाय, शेतीची माहिती मिळावी. यासाठी सोशल मीडियासारखा विषय अभ्यासात असण्याची गरज जगभरातील बरेच तज्ज्ञ व्यक्त करतात.

२० वर्षे पुढे काय प्रगती होईल? याचा विचार करत आतापासूनच करायला. त्यामुळं त्या दिशेनं पावलं टाकण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा अभ्यासक्रमात समावेश करुन, या दिशेनं एक पाऊल टाकता येणं शक्य आहे. 'हिच विनंती करणारं पत्र सोशल मिडीया विश्लेषक अजीत पारसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं आहे.

आज दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी पास होऊन अकरावीत प्रवेश घेणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना जग समजून घेण्यासाठी सोशल मीडियाचा अकरावीपासून समावेश व्हावा, ही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा वापर फक्त अफवा पसरवणे किंवा समाज विघात कृत्यांसह विनाशकारी वृत्तीसाठी नाही, तर उद्याचं जग कवेत घेणाऱ्या तरुणांना विकासाच्या वाटा दाखवणारंही ठरु शकते. पण त्यासाठी राज्यकर्त्यांनी एक पाऊल पुढे टाकत, याचा सकारात्मक विचार करण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

Updated : 29 July 2020 4:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top