युतीच्या ३० जागा धोक्यात !
Max Maharashtra | 9 Oct 2019 5:29 AM GMT
X
X
भाजप आणि शिवसेनेची युती झाली खरी. मात्र यांच्यासमोर आता सर्वात मोठी डोखेदुकी ठरणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत युतीला काही बंडखोरांनाच रोखण्यात यश आले. अनेक मतदारसंघात अजूनही बंडखोरी दिसून येत असल्यानं याचा फटका भाजप-शिवसेना महायुतीला बसू शकतो.
भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाल्यामुळे पक्षातील इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आले आणि आयात उमेदारांना तिकिट मिळाल्यामुळेही पक्षातील नाराजी समोर आली. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर आघाडीला फायदा आणि युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, पुणे, कोकण, सोलापूर आणि नाशिक आणि मुंबईतील ३ जागांमध्येही बंडखोरी झाली आहे.
हे ही वाचा
विधानसभा निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षाचे १६ उमेदवार रिंगणात
शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसे ची माघार
महायुतीचे बंडखोर उमेदवार
कसबा – विशाल धनवडेमीरा
भाईंदर – गीता जैन
उरण – महेश बालदी
कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वर्सोवा – राजूल पटेल
वांद्रे पूर्व – तृप्ती सावंत
अंधेरी पूर्व – मुरजी पटेल
सिंधुदुर्ग – सतीश सावंत
सावंतवाडी – राजन तेली
कुडाळ – रणजीत देसाई
रामटेक – आशिष जैस्वाल
फुलंब्री – रमेश पवार
कन्नड – किशोर पवार
पिंपरी-चिचंवड – राहुल कलाटे
करमाळा – नारायण पाटील
Updated : 9 Oct 2019 5:29 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire