गोरगरिबांच्या, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या प्राथमिक आहारात ह्या बिस्किटाला अनन्य स्थान आहे. आजारी असलेला पेशंट असो, किंवा रस्त्यावर भीक मागणारा भिकारी, मजूर , कामगार किंवा विद्यार्थी असो , पार्लेच्या एक पुड्यावर लोक अख्खा दिवस काढतात.
ही बिस्कीट सर्वसामान्य गोरगरीबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ह्या बिस्किटासोबत असंख्य भारतीय लोक भावनिक पातळीवर जुळलेले आहेत .
पार्ले जी जगामध्ये नंबर 1 वर कसा आणि का आहे हयाची केस स्टडी जगातील टॉप युनिव्हर्सिटीजमधील मॅनेजमेंट स्कुल्समध्ये , advertising कॉलेजेस मध्ये शिकविली जाते. प्रॉडक्ट्ची गुणवत्ता कायम ठेवत किंमतही कमी आणि स्थिर ठेवणे हे या कंपनीचे वैशिष्टय मानले जाते.
अशी अगाध महिमा पार्ले जी बिस्किटांची आहे.
कंपनीने किंमत स्थिर ठेवण्यासाठी बिस्किटांची संख्या कमी केली , आकार थोडा लहान केला पण तरी देखील आता जीएसटी मुळे ह्या ऐतिहासीक ब्रॅंडचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.