Home > News Update > ..ही वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. सामनाच्या अग्रलेखावर निखिल वागळेंचं ट्वीट व्हायरल.

..ही वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. सामनाच्या अग्रलेखावर निखिल वागळेंचं ट्वीट व्हायरल.

..ही वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. सामनाच्या अग्रलेखावर निखिल वागळेंचं ट्वीट व्हायरल.
X

दै. महानगर आणि त्यानंतर आयबीएन लोकमत मधून सातत्याने शिवसेनेवर टीका करणाऱ्या वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर शिवसेनेने अनेकदा हल्ले केले. शिवसेनेने वागळेंच्या चारित्र्यहननाचीही मोहीम अनेकदा राबवली. मात्र, याच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना चा अग्रलेख निखिल वागळे यांनी शेअर केला आहे. नरेंद्र मोदी सांगतात एक आणि लोकं करतात वेगळं याचा अर्थ नरेंद्र मोदींचा लोकांशी संवाद तुटलाय असं आज सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

एका पक्षाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकार हजारों कार्यकर्ते रस्त्यावर उतरू देणार आहे का हा सगळ्यात मोठा सवाल आहे. नाहीतर येत्या काळात मोदींचा पक्ष राहायचा जीवंत आणि देश आयसीयु मध्ये असायचा. वाचा रवींद्र आंबेकर यांचा लेख

नरेंद्र मोदींची गफलत…

टाळ्या थाळ्या आणि दिवे, अशाने युद्ध हरू

( सामनाचा अग्रलेख वेगळा अपलोड करून लिंक इथे द्या निखिल वागळे यांनी जमाना बदल गया हैं, असं म्हणत आपल्या जुन्या व्यथांना वाट मोकळी करत सामनाचा अग्रलेख शेअर करायची वेळ कधी येईल असं वाटलं नव्हतं असं निखिल वागळे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी 9PM9minutes असा कार्यक्रम देऊन देशातील जनतेला दिवे लावायला सांगीतलं होतं. त्याआधी त्यांनी थाळीनाद, घंटानाद करायला सांगितलं होतं. अमेरिकेने भारताकडे गोळ्या मागितल्या औषधं मागितली, थाळी, घंटा, दिवे मागितली नाहीत. यावरून गंभीरता लक्षात यायला पाहिजे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. श्री. ठाकरे हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे. पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. कोरोना युद्धाची स्थिती ‘पानिपत’सारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त 'मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतरही अखेर जे व्हायचे तेच झाले. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी जी उपाययोजना सांगितली त्यात सर्वप्रथम त्यांनी घराच्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितल्या व रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावाव्यात असे आवाहन केले. पण लोकांनी रविवारी काय केले ते पाहण्यासारखे आहे. काहीतरी गडबड निश्चित आहे. पंतप्रधानांच्या भावना लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत असे दिसते. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते. लोकांनी काळोख केला हे खरे, पण त्या काळोखात लोक पुन्हा 'झुंड’ करून रस्त्यांवर उतरले. हातात मेणबत्या, टॉर्च, मोबाईलच्या बॅटऱ्या नाचवत थयथया नाचू लागले. त्यामुळे कोरोनाशी लढताना ज्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ची सगळय़ात जास्त गरज आहे त्याची ऐशीची तैशी झाली.

पंतप्रधानांनाही हा तमाशा नक्कीच अपेक्षित नसावा. लोकांनी रस्त्यांवर येऊन रांगोळ्या काढल्या व त्यावर मोठ्या प्रमाणात पणत्या लावल्या. अनेक ठिकाणी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. त्या फटाक्यांमुळे सोलापुरात गवताच्या गंजींना आगी लागल्या. एक चित्र आम्ही असे पाहिले की, एक भक्त पेटत्या दिव्यावर त्याच्या तोंडातील रॉकेल उडवून प्रकाशाची मात्रा वाढवीत आहे, पण झाले उलटेच. या प्रयोगात त्याच्याच तोंडास आग लागली. असे प्रकार देशभरात सर्वत्र घडले. कोरोनामुळे आज हजारो रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी त्यांचे प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल. पंतप्रधान नक्की काय सांगत आहेत ते समजून न घेता जनता अशी मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे. लोक मशाली आणि दिवट्या घेऊन रस्त्यांवर उतरले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीस सकाळपासून रस्त्यावर येणाऱ्या लोकांना थांबवत होते. त्यांच्याशी वाईटपणा घेत होते. पण रविवारी रात्री नऊ वाजता पंतप्रधान मोदी यांच्याच आदेशाने लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे

कायदा व नियम मोडून

पडले. याचा सरळ अर्थ आम्ही असा काढला की, पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोक आपापली सोय पाहत आहेत. दुसरे असे की, पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. शेवटचा अर्थ असा की, जे घडते आहे तसे 'उत्सवी’ वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे. रात्री नऊ वाजता हाती प्रकाशकिरणे घेऊन लोक रस्त्यांवर उतरले व त्यांनी 'चीनच्या आयचा घो’, ‘गो कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या. चीनला शिव्या देणे, त्याविरुद्ध संताप व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. पण कोरोनाशी लढताना चीनच्या जनतेने शिस्त पाळली. 'लॉक डाऊन’च्या काळात तेथील जनता घरीच बसून होती. चीनच्या जनतेने सरकारी आदेश पाळले त्यामुळे कोरोनाच्या लढाईत चीन विजयी होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सध्या चीनबाबत सगळ्यात जास्त शिवराळ भाषा वापरत आहेत, पण चीनला शिव्या देऊन त्यांना कोरोनावर मात करता आली नाही. न्यूयॉर्क राज्यात कोरोनाने हजारो बळी घेतले आहेत. महासत्ता अमेरिका हतबल आणि लाचार झाली आहे. प्रे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींकडे कोरोनाशी लढण्यासाठी औषधे मागितली आहेत. ट्रम्प यांनी हिंदुस्थानकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत हे आपल्याकडील उत्साही व उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी हवेत गोळीबार केला. या वीरांगनेस तत्काळ चीनच्या सीमेवर पाठवून तिचे शौर्य दाखवण्याची संधी तिला मिळायला हवी. महाराष्ट्रातील वर्धा येथील भाजप आमदार दादाराव केचे यांनीही 'लॉक डाऊन’ला धाब्यावर बसवून आपला वाढदिवस साजरा केला. त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. त्यातून 'सोशल डिस्टन्सिंग’चीही पुरती वाट लागली. आता त्यांना स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावली आहे हे ठीक आहे, पण ज्यांनी गर्दी जमणार नाही याची फिकीर करायची तेच बेफिकीरपणे वागत असतील तर कसे व्हायचे? देशात आता

कोरोनाचा कहर

वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 700 पेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 4,000 पेक्षा जास्त झाली आहे. मुंबईसारख्या शहरातही रविवारी एकाच दिवशी कोरोना व्हायरसने 13 बळी घेतले आहेत. नवी मुंबई, संभाजीनगरातही मृत्यू झाले आहेत. सोमवारी राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 830 च्या घरात पोहोचली. तसेच मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 490 झाला आहे. म्हणून लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. श्री. ठाकरे हे लोकांना मदत कशी करता येईल यावर भर देत आहेत. वैद्यकीय सुविधा कशा वाढवता येतील यावर लक्ष ठेवून आहेत. लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे जी परिस्थिती हाताळत आहेत ती खरच कौतुकास्पद आहे,’ असे ट्वीट ओमर यांनी केले आहे. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे. पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. सदाशिवराव भाऊंचे रणंगणावर नेमके काय झाले? ते हरवले की ईश्वरलोकी गेले हा संभ्रम कायम राहिला. कोरोना युद्धाची स्थिती ‘पानिपत’सारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त 'मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत.

Updated : 7 April 2020 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top