अशी ही पळवापळवी
Max Maharashtra | 25 July 2019 7:27 AM GMT
X
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आता शिवसेनेचे नेते असणार आहेत. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असून मातोश्री या उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हातात शिवबंधन बांधून घेतलं आहे.
गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईचा चेहरा असलेल्या सचिन अहिर यांनी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद ही भुषवलेलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने विरोधी पक्षनेता पळवल्यानंतर आता शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष पळवला आहे. येत्या काळात ही पळवापळवी सुरूच राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही विद्यमान आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.
Updated : 25 July 2019 7:27 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire