Home > News Update > अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाना यश, विधान परिषद निवडणूक बिनविरोध

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाना यश, विधान परिषद निवडणूक बिनविरोध

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाना यश, विधान परिषद निवडणूक बिनविरोध
X

राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील संकट आलं होतं. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुकांना हिरवा झेंडा दाखवल्यानं राज्यात ९ जागांसाठी २१ मे ला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे.

प्रत्येक पक्षाचं विधानसभेतील पक्षबळ पाहता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज येतो. एक जागा निवडून येण्यासाठी ३२ मतदानांची गरज (कोटा) आवश्यक आहे. त्यामुळं भाजपच्या ३ जागा सहज निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने चार जागा उभ्या केल्या आहेत. त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना देखील दोन उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं निवडणूक आकड्यांवर नजर टाकली तर निवडणूक बिनविरोध होणार कशी असा सवाल उपस्थित केला जात होता.

विधानसभेतील पक्ष निहाय संख्या बळ

भाजप १०५

शिवसेना ५६

राष्ट्रवादी काँग्रेस ५४,

काँग्रेस ४४,

बहुजन विकास आघाडी ३,

समाजवादी पार्टी – २,

एम आय एम – २,

प्रहार जनशक्ती – २,

मनसे – १,

माकप – १,

शेतकरी कामगार पक्ष – १,

स्वाभिमानी पक्ष – १,

राष्ट्रीय समाज पक्ष – १,

जनसुराज्य पक्ष – १,

क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १ आणि

अपक्ष – १३

वरील आकडेवारी चा विचार करता भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. भाजप ही निवडणूक अपक्षांचा आधार घेत जिंकणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आपला 1 उमेदवार मागे घेण्यास तयार नव्हते. भाजप त्यांच्या कडे संख्याबळ असल्याचं सांगत होते. तर दुसरीकडे कॉंग्रेस दोन जागा देणाऱ्या कॉंग्रेस ने एक जागा मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध कशी होणार? असा पेच निर्माण झाला होता.

तो पेच अखेर सुटला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली असून कॉंग्रेस आपली एक जागा मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस ने अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे ह्याच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार असतील हे निश्चित मानलं जात आहे. कॉंग्रेस ने जाहीर केलेल्या यादीत दोन उमेदवारांना संधी दिली आहे. राजेश धोंडीराम राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी आता यांच्या पैकी कोणता उमेदवार आपला अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री ऊधदव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली. मी प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे.

— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2020

Updated : 10 May 2020 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top