फडणवीसांच्या आव्हानानंतर ट्रेंड होतोय #हिंमतअसेलतर; उडवली जातेय खिल्ली
Max Maharashtra | 17 Feb 2020 3:24 AM GMT
X
X
काल नवी मुंबईत भाजपचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. हिंमत असेल तर जनादेशाला सामोरे जावून दाखवा. राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, असं आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.
त्यानंतर काल रात्रीपासून महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून फडणवीस यांच्या या आव्हानाचा चांगलाच समाचार घेतला जातोय. फेसबुक आणि ट्विटरवर #हिंमतअसेलतर हा हॅशटॅग वापरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वेगवेगळी आव्हानं देत खिल्ली उडवण्यात येतेय.
Updated : 17 Feb 2020 3:24 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire