मुंबई, पुणे शनिवार पासून लष्कराच्या ताब्यात जाणार का? काय आहे सत्य?
Max Maharashtra | 26 May 2020 4:41 PM GMT
X
X
सध्या मुंबई आणि पुणे ही दोनही शहर येत्या शनिवारपासून 10 दिवसासाठी लष्कराच्या ताब्यात जाणार आहेत. त्यामुळं तात्काळ किराणा माल, फळ, भाजीपाला, मेडीसीन घेऊन ठेवा. महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल अशा आशयाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
काय आहे सत्य?
राज्य शासनाने या पोस्ट संदर्भात तात्काळ स्पष्टीकरण दिलं असून सदरहू पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकली आहे असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Updated : 26 May 2020 4:41 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire