Home > News Update > उद्धव ठाकरे यांच्या ‘मारु बोंब’ ला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

उद्धव ठाकरे यांच्या ‘मारु बोंब’ ला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

उद्धव ठाकरे यांच्या ‘मारु बोंब’ ला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
X

आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार ने राज्य सरकारला केलेल्या मदतीबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह द्वारे जनतेशी केलेल्या संवादामध्ये

केंद्राकडे पैसे अडकलेत, पीपीई किट ला परवानगी उशीरा मिळाली, धान्याचा प्रश्न आहे, रेल्वे तिकिटांची समस्या.... मारू बोंब? नाही. मी राजकारण करणार नाही. संकटाचा काळ आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपतोय. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

यावर आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने आत्तापर्यंत राज्यसरकारला केलेल्या मदतीचा आकडा राज्यासमोर मांडला आहे. काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी...?

प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले.

गहू : 1750 कोटी रूपये

तांदूळ : 2620 कोटी रूपये

डाळ : 100 कोटी रूपये

स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये*

असे एकूण

एकूण : 4592 कोटी रूपये

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1726 कोटी रूपये

जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये

विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्र सरकारने दिले.

उज्वला गॅस योजनेत 73 लाख 16 हजार सिलेंडरसाठी 1625 कोटी रूपये 600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रूपये

बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रूपये.

एसडीआरएफमध्ये 1611 कोटी रूपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रूपये असे एकूण 2059 कोटी रूपये दिले.

डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5648 कोटी रूपये देण्यात आले

शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी

कापूस : 5647 कोटी रूपये

धान : 2311 कोटी रूपये

तूर : 593 कोटी रूपये

चणा/मका : 125 कोटी रूपये

तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये

हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत.

महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत

महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: 47 लाख 20 हजार

प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय 41/खाजगी 31

पीपीई किटस : 9.88 लाख

एन 95 मास्क : 15.59 लाख

आरोग्यासाठी मदत : 468 कोटी

केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील.

जे मिळाले ते 28 हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो 1,65,000 कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील 78 हजार कोटी रूपये असे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. आता गरज धाडसी निर्णयांची

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ.

आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत

Updated : 26 May 2020 3:43 PM GMT
Next Story
Share it
Top