दिल्ली – ‘मन’ की नव्हे ‘आप’ की बात !
Max Maharashtra | 11 Feb 2020 7:59 AM GMT
X
X
दिल्लीकरांनी अखेर आपली मन की बात जाहीर करत सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला संधी दिली आहे. गेले महिनाभर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावत दिल्लीचा तख्त ताब्यात घेण्याची तयारी केली होती. पण दिल्लीकरांनी विकासाला प्राधान्य देत केजरीवाल यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
‘आप’ ने बहुमताचा ३६ चा आकडा केव्हाच पार केलाय. तर भाजपनंही गेल्यावेळच्या ३ जागांवरुन सुधारणा करत १२ जागांवर आघाडी घेतली आहे. पण दिल्लीत आपची सत्ता येणार हे आता निश्चित झाले आहे.
Updated : 11 Feb 2020 7:59 AM GMT
Tags: #AssemblyElection 2020 aap bjp election
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire