Home > News Update > 'अब्दुल सत्तार गद्दार, 'मातोश्री'ची पायरी चढू देऊ नका' – चंद्रकांत खैरे

'अब्दुल सत्तार गद्दार, 'मातोश्री'ची पायरी चढू देऊ नका' – चंद्रकांत खैरे

अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका – चंद्रकांत खैरे
X

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ‘महाविकास आघाडी’त बिघाडी झाल्यानं उपाध्यक्ष पद भाजपला गेले आहे. त्यामुळं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

"सत्तारांच्या लोकांचं मतदान औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मिळालं नाही, त्यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत. ते भाजपकडे का गेले? त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. मी उद्धव ठाकरे यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांना हाकलून द्यावं," अशी सडकून टीका खैरे यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्याबळ २३ भाजपकडे आहे. मनसे १, डेमोक्राटीक १ असे इतर पक्षीय बलाबल आहे. जर महाविकास आघाडीचा विचार केला तर, शिवसेना-१८, काँग्रेस-१६, राष्ट्रवादी -३ असं एकूण ३७ जिल्हा परिषद सदस्याची मत महाविकास आघाडीकडे होती. मात्र, ही मत महाविकास आघाडीला मिळाली का? तर नाहीत.

महाविकास आघाडी आणि भाजपला 30-30 अशी समान मत मिळाली. त्यामुळं ही मत फुटली का तर निश्चित फुटली. मात्र, 30-30 अशी समान मत मिळाल्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीमध्ये काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली.

मात्र, उपाध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत वेगळीच स्थिती पाहायला मिळाली. अध्यक्षाच्या निवडणुकीत दोन सदस्यांनी आपलं मत भाजपच्या पारड्यात टाकल्यानं भाजपच्या उपाध्यक्षपदी लहानू गायकवाड यांची निवड झाली आहे.

त्यामुळं महाविकासाघाडीची दोन मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाला ३२ व शिवसेनेच्या उमेदवाराला २८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळं उपाध्यक्षपदी भाजपचा विजय झाला, असा आरोप खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 'सत्तार यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही,' अशी टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

Updated : 4 Jan 2020 3:19 PM GMT
Next Story
Share it
Top