Home > News Update > कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरीच उपचार

कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरीच उपचार

कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरीच उपचार
X

कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर सातारा जिल्ह्यामध्ये आता गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. ते उपचार काय आणि कसे असणार आहेत. याबद्दल जनतेत संभ्रम होऊ नये म्हणून सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ऑनलाईन पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ही पुस्तिका QR कोडसह सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृह विलगीकरण कसे आहे ते पाहूया...

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ८० टक्के कोरोना बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे या सर्वांचे आता गृहविलगीकरण करुन उपचार करणे शक्य होणार आहे.

मार्गदर्शक सूचना आणि अटी

● वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला आहे हे प्रमाणित केल्यानंतर गृह विलगीकरणाबाबतची माहिती देतील.

● रुग्णांसाठी खेळती हवा असलेली आणि स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली खोली असावी. तसेच घरात २४ तास काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असणे आवश्यक आहे. नसल्यास रुग्णाची व्यवस्था कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येईल.

● गृह विलगीकरणानंतर पुढचे दहा दिवस रुग्णांची नियमित तपासणी फोनद्वारे करण्यात येईल.

● दहा दिवसांमध्ये कोणतेही लक्षण न आढळल्यास रुग्ण गृह विलगीकरण संपवू शकतो. विषेश बाब म्हणजे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

● घरातील कोणीही व्यक्ती (५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेय, ह्दयविकार, जुनाट यकृत, फुप्फूस, मूत्रपिंडाच्या रूग्णांची कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी.

● आरोग्य सेतू ॲप असणे आवश्यक. तसेच नोटिफीकेशन्स, ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रॅकिंग पुर्ण वेळ चालु राहणे गरजेचे आहे.

● रुग्ण गृह विलगीकरणात असताना १ टक्के सोडियम हायपोक्लोराईटच्या साहाय्याने सतत संपर्कात येणाऱ्या गोष्टी उदा : स्विच बोर्ड, खिडक्या, दरवाजाचे नॉब, खुर्ची, जेवणाचे टेबल, कपाट इ. साफ कराव्यात.

कोरोनाच्या रूपाने आपल्यावर कोसळलेल्या अभूतपूर्व संकटाचा आपण एकत्रितपणे आणि जिद्दीने सामना करीत आहोत. मात्र संकटाचे स्वरूप आणि टप्पे जसजसे बदलत जातील तसतशी आपल्यालाही रणनीती बदलावी लागणार आहे. होम आयसोलेशन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे. सहकार व पणन मंत्री, बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

Updated : 5 Aug 2020 2:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top