एका मोठ्या पर्वाचा अंत झाला - अमोल पालेकर
Max Maharashtra | 18 Dec 2019 3:04 AM GMT
X
X
मराठी रंगभूमीला सुवर्णकाळापर्यंत घेऊन जाणारे जे दिगग्ज होते त्यात डॉ श्रीराम लागू यांचं व्यक्तिमत्त्व प्रचंड मोठं होतं..माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले...त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले..त्यांचा मला अतिस्नेह लाभला हे माझे मोठे भाग्य म्हणायला पाहिजे...अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून नाटक, अभिनय नाही तर अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या...आयुष्याबद्दल वेगळा दृष्टिकोन देणारी शिकवण ज्या काही मोजक्या मंडळींनी दिली त्यात लागू यांचे नाव अग्रक्रमाने आहे..त्यांना सर्वार्थाने शांती लाभो...
Updated : 18 Dec 2019 3:04 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire