‘ही मदत म्हणजे शेतकरी बापाच्या मयतीला केलेला आहेर आहे’ - अजित नवले
Max Maharashtra | 19 Nov 2019 6:34 PM GMT
X
X
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्याची थट्टा केली जात आहे. यामुळे आज पुण्यातील शिवाजीनगर येथील ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनी पासून कृषी आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसंच ठिय्या आंदोलनही करण्यात आले.
हे ही वाचा
पीएमसी बँकेच्या खातेदाऱ्यांना एकनाथ गायकवाड यांनी दिला दिलासा..
शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं अन्न धान्य फाटलेल्या पोत्यात…!
८ हजारात महिन्याचा खर्च निघत नाही, वर्ष कसं काढयाचं
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत तुटपूंजी असल्याचं म्हटलं आहे. 'राज्यात ओल्या दुष्काळाने ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये म्हणजेच गुंठ्याला ८० रुपये मदत राज्यपालांनी जाहीर केली आहे. ही अत्यंत तुटपुंजी मदत म्हणजे शेतकरी बापाच्या मयतीला केलेला आहेर आहे,' अशी जळजळीत यांनी केली.
Updated : 19 Nov 2019 6:34 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire