वारकरी दिंडीत जेसीबी घुसल्यानं अपघात; दोन वारकरी जागीच ठार
Max Maharashtra | 19 Nov 2019 6:04 AM GMT
X
X
पुणे :पंढरपूर ते आळंदी वारी करणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 वारकरी जागीच ठार झाले असून 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संत नामदेव पालखी सोहळ्याची दिंडी प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर ते आळंदी प्रवास करत होती. यावेळी आळंदीकडे येत असताना दिवे घाटात हा अपघात झाला. घाटात दिंडी उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जेसीबीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि जेसीबी थेट दिंडीत घुसला. काही क्षणात आरडाओरडा झाला मात्र, या सुन्न करणाऱ्या अपघातात दोन वारकऱ्यांना नाहक जीव गमवावा लागला. या अपघातात 3 वारकरी किरकोळ जखमी असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Updated : 19 Nov 2019 6:04 AM GMT
Tags: ajit pawar amit shah bjp congress devendra fadanvis Maharashtra Election Maharashtra Election 2019 max maharashtra maxmaharashtra narendra modi news Shivsena Warkari Dindi देवेंद्र फडणवीस शरद पवार
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire