Home > News Update > आत्मनिर्भर पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल - चंद्रकांत पाटील

आत्मनिर्भर पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल - चंद्रकांत पाटील

आत्मनिर्भर पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल - चंद्रकांत पाटील
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना संबोधित करत असतांना २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर विशेष पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमुळे अर्थअव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के एवढे मोठे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले आहे. याचा लाभ देशातील सर्व घटकांना मिळेल आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय, लघु उद्योजक अशा सर्वांच्या सहभागाने देश महासत्ता होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Updated : 13 May 2020 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top