Home > News Update > स्वाभिमानी लढवणार विधानसभेच्या ४९ जागा

स्वाभिमानी लढवणार विधानसभेच्या ४९ जागा

स्वाभिमानी लढवणार विधानसभेच्या ४९ जागा
X

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ४९ जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली त्यात हा ठराव पारित करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आले होते. मात्र या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामना सहन करावा लागला. त्यामुळे विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४९ जागांवर तयारी सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated : 4 July 2019 5:16 AM GMT
Next Story
Share it
Top