गणपती विसर्जनावेळी बोट उलटून ११ जणांचा मृत्यू
Max Maharashtra | 13 Sep 2019 3:58 AM GMT
X
X
गणपती विसर्जनावेळी बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे. भोपाळच्या खटलापूरा मंदीर घाट परिसरात शुक्रवारी गणपतीचं विसर्जन करण्यासाठी काही भाविक बोट घेऊन नदीत गेले होते. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्यामुळे बोट उलटली. या दुर्घेटनेत ९ जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र ११ जणांना जलसमाधी मिळाली आहे. २ भाविक बेपत्ता आहेत.
घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसराचा ताबा घेतला. बचावकार्य वेगात सुरू असून बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी एनडीआरफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
Updated : 13 Sep 2019 3:58 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire