Home > मॅक्स रिपोर्ट > 'विस्थापितांना बाहेर काढण्याची ताकद आमच्यातच': अमित शहा

'विस्थापितांना बाहेर काढण्याची ताकद आमच्यातच': अमित शहा

विस्थापितांना बाहेर काढण्याची ताकद आमच्यातच: अमित शहा
X

घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय लोकांना देशाबाहेर आणि मतदारयादीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे. वोट बँकेसाठीच काँग्रेस सरकारने बांग्लादेशी नागरिकांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला नाही. ही हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच असून विस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची ताकद फक्त आमच्या सरकारमध्येच आहे असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा राज्यसभेत म्हणाले.

भारताचे नागरिक असल्याचा पुरावा आसाममधील ४० लाख लोकांकडे नाही व तो त्यांना सादर करता आला नाही. आसाममध्ये स्थानिक लोकांचे मूलभूत हक्क आणि सर्वच गोष्टींवर अतिक्रमण केले आहे.

काय म्हणाले अमित शहा:

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त आमच्या सरकारमध्ये.

-फक्त वोट बँकेसाठी काँग्रेसने घुसखोरांना आश्रय दिला होता.

-आसाममधील ४० लाख लोक भारताचे नागरिक नाहीत.

Updated : 1 Aug 2018 3:53 AM GMT
Next Story
Share it
Top