Home > मॅक्स रिपोर्ट > पाकिस्तानचा बदला घेतल्याचा आनंद, शहिदांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

पाकिस्तानचा बदला घेतल्याचा आनंद, शहिदांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

पाकिस्तानवर भारतीय वायू सेनेने केलेल्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांमध्ये लोणारच्या चोरपांग्रा येथील नितीन राठोड आणि मलकापूर येथील संजयसिंह राजपूत या जवानांचा समावेश आहे.. या हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये पाकिस्तान बाबत राग निर्माण झाला होता. त्यानंतर आज सकाळी भारताच्या वायुदलाने पाकिस्तानमध्ये घुसून दाहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर शहिदांच्या कुटुबियांशी आम्ही बातचित केली असता त्यांनी पाकिस्तानला संपूर्णपणे नष्ट करावे अशी भावना व्यक्त केलीय.

https://youtu.be/J4lwCwBHMek?t=15

Updated : 26 Feb 2019 11:57 AM GMT
Next Story
Share it
Top