Home > मॅक्स रिपोर्ट > प्रो. जे डी अग्रवाल यांना जसं या सरकारने मारलं तसं अण्णांना मारू शकत नाही – डॉ. राजेंद्र सिंह
प्रो. जे डी अग्रवाल यांना जसं या सरकारने मारलं तसं अण्णांना मारू शकत नाही – डॉ. राजेंद्र सिंह
Max Maharashtra | 4 Feb 2019 4:22 AM GMT
X
X
या देशाला अण्णा पाहिजेत. अण्णा या देशाचं प्रतिक आहे त्यामुळे देशातील जनता अण्णांसोबत आहे. तसेच या सरकारने अण्णांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत असं मत पर्यावरतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. सिंह अण्णांच्या भेटीला आले असता त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना या सरकारने वेळीच निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. तसेच यावेळी सरकारच्या ढिम्मपणावर उत्तर देताना डॉ. सिंह म्हणाले की, जसं गंगा नदीसाठी लढा उभारणाऱ्या प्रो. जे डी अग्रवाल ला तुम्ही मारलं तसं अण्णांना मारू शकत नाही. अण्णा देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहेत आणि जनता त्यांच्या सोबत आहे. म्हणून अण्णा जेडी अग्रवाल नाहीत तुम्ही वेळीच तोडगा काढावा असं ठणकावून डॉ. सिंह यांनी सरकारला सांगितलं आहे. पाहा हा व्हिडिओ..
Updated : 4 Feb 2019 4:22 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire