Home > मॅक्स रिपोर्ट > मॅक्समहाराष्ट्र च्या पाठपुराव्याला मोठं यश: अखेर आमले गावाला जोडणारा लोखंडी पुलाचे काम पूर्ण

मॅक्समहाराष्ट्र च्या पाठपुराव्याला मोठं यश: अखेर आमले गावाला जोडणारा लोखंडी पुलाचे काम पूर्ण

मॅक्समहाराष्ट्र च्या पाठपुराव्याला मोठं यश: अखेर आमले गावाला जोडणारा लोखंडी पुलाचे काम पूर्ण
X

पालघर: मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर वसलेल्या 62 घरवस्ती व 322 लोकसंख्या असलेल्या आमले गाव सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे विकासापासून दूर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमले गावाला जोडणार पूल नव्हता. परंतू या गावात पाडा समीतीच्या सदस्य व आरोहण च्या प्रयत्नाने गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी येथे पूल बांधण्यात आला.

एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी वनविभागाच्या विरोधामुळे पूल बींब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. 2014 पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर पडणं शक्य नसायचं. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोली बनवून 5-6 किमी चे अंतर डोंगर चढुन दवाखान्यापर्यंत रूग्णांना पोहोच करायचे. त्या अर्धवट बींबा चा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने 2014-15 मध्ये लोखंडी साकव बांधण्यात आला होता. गेली 4-5 वर्षे त्या साकवामुळे पावसाळ्यात देखील लोकांना रहदारी करता येत होती.

परंतु मागील पावसाळ्यात गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा लोखंडी पूल (साकव) वाहुन गेल्याने पावसाळ्यात तिथे मोटारसायकल घेऊन जाताना दोन्ही बाजूने प्लास्टिक ड्रमचा वापर करावा लागत होता. मुलांना देखील तारेचा आधार घेऊन ये – जा करावी लागत होती. परंतु याबाबत मॅक्समहाराष्ट्र ने सातत्याने पाठपुरावा केल्याने पूरग्रस्त निधीतून लोखंडी पुलासाठी 26 लाखाचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. अन् काही महिन्यातच आमले गावाला जोडणारा नवीन लोखंडी पुल तयार झाला आहे.

मॅक्समहाराष्ट्र ने यासाठी केलेला पाठपुरावा...

आम्ही मतदान का करावं? आमले वाशियांचा जाहीरनामा

आमले वाशीयांची जीवघेणी परवड थांबणार.?

Max Impact : आमले वाशीयांची जीवघेणी परवड थांबणार! मॅक्समहाराष्ट्र च्या पाठपुराव्याने 26 लाखाचा निधी मंजूर

याशिवाय या पुलाची रुंदी आणि उंचीही वाढवली असल्याने भर पावसाळ्यातही रुग्णवाहीका आणि छोटी गावे या गावात पोहचु शकणार आहेत.

यामुळे या गावाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे गाव खऱ्या अर्थाने संपर्कात येणार आहे. याशिवाय रेशनसाठी मतदानासाठी येथील लोकांना १० ते १५ किमी अंतर कापावे लागत असल्याचे येथील लोकांनी आमदार भुसारा यांना सांगितले. यानंतर या लोकांना रेशनिंगचे धान्य गावातच मिळावे यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला आमदारांनी दिल्या आहेत.

यावेळी तेथील लोकांच्या अनेक समस्या समाजावून घेवून त्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी आमदार भुसारा यांनी दिले आहे. यावेळी मत मागायला किंवा निवडणूकाजवळ आल्यावर सगळेच येतात. मात्र, निवडून आल्यावर तात्काळ आमच्या गावाला भेट देणारा पहिलाच लोकप्रतिनिधी असल्याच्या भावना येथील लोकांनी व्यक्त केल्या.

Updated : 3 Jun 2020 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top