मुंबईतील विकासकामांचा प्राण्यांना फटका
Max Maharashtra | 28 Dec 2019 11:13 AM GMT
X
X
काही दिवसांपुर्वी कुर्ल्यातील पोलिस शिपाई सचिन भगत यांचा झोपेत सर्पदंशाने मृत्यु झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि वन्यप्राणी आपल्या घरात शिरतायत म्हणुन ओरड चालू झाली. मात्र, ते आपल्या घरात शिरकाव करतायत की आपण त्यांच्या घरात? हा प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे.
दिवसेंदिवस सिमेंटची वाढती जंगलं आणि कमी होणारी वनसंपत्ती यामुळे वन्यजीवांची घरं आपण नष्ट करतोय. शहरी वस्त्यांमध्ये प्राण्यांचा वावर वाढतो आहे. तशा बातम्याही सतत आपल्याला पाहायला मिळतात. शहरातील वाढत्या विकासप्रकल्पांचा त्रास प्राण्यांना होतो आहे. परिणामी स्वत:च्या सुरक्षेसाठी हे प्राणी आपल्या वस्त्यांमध्ये येत असल्याचं सर्पमित्र सांगताहेत. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1204959053038953/?t=0
Updated : 28 Dec 2019 11:13 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire